Posts

Showing posts from July, 2023

३१ जुलै ❀* *लेखक मुन्शी प्रेमचंद जन्मदिन*

Image
 *❀ ३१ जुलै ❀* *लेखक मुन्शी प्रेमचंद जन्मदिन* जन्म - ३१ जुलै १८८० (वाराणसी) स्मृती - ८ ऑक्टोबर १९३६ मुन्शी प्रेमचंद यांचे धनपत राय हे खरे नाव होते. साहित्य आणि कादंबरी क्षेत्रात त्यांनी केलेल्या उल्लेखनीय कामगिरीसाठी मुन्शी प्रेमचंद यांना ‘उपन्यास सम्राट’ म्हणूनही ओळखले जाते. प्रेमचंदांनी १९१३ ते १९३१ पर्यंत एकूण २२४ कथा, १०० लेख आणि १८ कादंबऱ्या लिहिल्या. त्यांची पहिली कादंबरी 'असरारे महाबिद' उर्दू भाषेत होती. ती उर्दू साप्ताहिक 'आवाज-ए-ख़ल्क' मध्ये ८ ऑक्टोबर १९०३ पासून क्रमशः प्रसिद्ध झाली, तर त्यांची शेवटची कादंबरी 'मंगलसूत्र' अपुरी राहिली. प्रेमचंद यांनी महात्मा गांधींच्या विचारांनी प्रेरित होऊन आपली सरकारी नोकरी सोडली व पहिली कादंबरी हिंदुस्थान वरील ब्रिटिश सत्तेच्या जुलमाची आणि भारतीयांच्या गुलामगिरीवर लिहिली. ती जेव्हा पुस्तकरूपाने प्रसिद्ध झाली, तेव्हा जप्त केली गेली. मात्र, देशद्रोहाच्या गुन्ह्याखाली अटक होण्यापासून प्रेमचंद वाचले. त्यानंतर त्यांनी आपले नबाब धनपतराय हे नाव बदलून प्रेमचंद घेतले.  १९२१ पर्यंत प्रेमचंद शिक्षण खात्यात डेप्युटी कलेक्टर म्हणू...

३१ जुलै ✹* *गायक मोहंमद रफी स्मृतिदिन*

Image
 *✹ ३१ जुलै ✹* *गायक मोहंमद रफी स्मृतिदिन* जन्म - २४ डिसेंबर १९२४ स्मृती - ३१ जुलै १९८० दिन ढल जायें हाय रात न जायें, तेरे मेरे सपने अब एक रंग है, कभी खुद पें कभी हालात पें रोना आया; अशा अनेक अजरामर गाण्यांमध्ये पडद्यावर दिसला तो चेहरा देव आनंदचा आणि आवाज होता मोहम्मद रफींचा. शास्त्रिय संगिताची तालिम त्यांनी उस्ताद बडे गुलाम अली खाँ, उस्ताद अब्दुल वाहिद खान, पंडित जीवनलाल मट्टो आणि फिरोज निजामी यांच्याकडे घेतली. रफीजींचा पहिला पब्लिक परफॉर्मन्स हा त्याच्या वयाच्या १३ व्या वर्षी लाहोर मध्ये झाला. पहिले गाणे  'गाँव की गोरी' या चित्रपटात त्यांनी १९४५ मध्ये गायले. त्याच दरम्यान गायना बरोबरच त्यांनी एक दोन चित्रपटात छोट्या छोट्या भुमिकाही केल्या. १९४७ मध्ये फाळणीनंतर रफीजींनी भारतात राहण्याचा निर्णय घेतला. १९४९ ते १९७० च्या दरम्यान रफीजींनी चित्रपटक्षेत्रात आपल्या जबरदस्त गायनाने चांगला जम बसवला व तो टिकवला देखील. १९६० चं दशक हे रफीजींसाठी खास होतं, त्याच वर्षी त्यांना 'चौदहवी का चाँद' च्या शिर्षकगीतासाठी पहिल्यांदाच फिल्मफेअर अॅेवॉर्ड मिळालं. याच दशकात रफीजींनी दिग्गज संगीत...

२९ जुलै ❀* *शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे जन्मदिन

 *❀ २९ जुलै ❀* *शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे जन्मदिन* जन्म - २९ जुलै १९२२ (सासवड,पुणे) स्मृती - १५ नोव्हेंबर २०२१ (पुणे) शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचा जन्म सासवड, पुणे येथे झाला. ते शिवचरित्र केवळ अभ्यासणारे न्हवते तर ते जिव्हाळ्याने अनुभवणारे आणि जणू शिवकाळातच राहून शिवचरित्र अक्षरश: जगणारे शिवशाहीर. म्हणजे बळवंत मोरेश्वर पुरंदरे उर्फ बाबासाहेब पुरंदरे. ’इतिहास माजघरापर्यंत गेला पाहिजे, पाळणाघरा पर्यंत गेला पाहिजे, इतकंच नव्हे तर आमच्या बहिणी, भावजया आणि लेकीसुना गरोदर असतील, तर त्यांच्या गर्भापर्यंत गेला पाहिजे’ असे म्हणणारे बाबासाहेब हे एकमेवाद्वितीयच. त्यांचे मूळ गाव पुणे जिल्ह्यातील सासवड. पण तरुणपणा पासूनच ते पुण्यातच स्थायिक झाले. पुढे भारत इतिहास संशोधन मंडळ या संस्थेत काम करू लागले. या ठिकाणीच इतिहाससंशोधक ग.ह. खरे हे बाबासाहेबांना गुरुस्थानी लाभले व इतिहास संशोधक म्हणून त्यांची वाटचाल सुरू झाली. सह्याद्रीचा एकेक कडा आणि एकेक शिखर हे ज्यांच्यासाठी चरित्रनायक आहेत. एकेक किल्ला हा ज्यांच्या महाकाव्याचा एक-एक अध्याय आहे, असे ज्येष्ठ इतिहासकार म्हणजे शिवशाहीर बाबासाहेब पुरंदर...

*@ २९ जुलै @* *नासा स्थापना दिन*

Image
 *@ २९ जुलै @* *नासा स्थापना दिन* स्थापना - २९ जुलै १९५८ नासा (नॅशनल अ‍ॅरोनॉटिक्स अँड स्पेस अ‍ॅडमिनिस्ट्रेशन) ही अमेरिकेची अवकाश संशोधन करणारी जगविख्यात संस्था. ही संस्था अमेरिकेची असली तरी या संस्थेसाठी भारतासहित जगभरातील शास्त्रज्ञ काम करीत असतात. १९५८ साली या संस्थेची स्थापना झाली. कोणे एके काळी, विसाव्या शतकाच्या सुरुवातीला, जागतिक स्तरावर फक्त दोनच महासत्ता अस्तित्वात होत्या. त्या दोन महासत्ता म्हणजे सोव्हिएत रशिया आणि अमेरिका. त्या दोघांनाही दुसऱ्यापेक्षा जास्त बलशाली व आधुनिक देश बनवण्याची इच्छा होती. साहजिकच त्यांच्यात अतिशय आक्रमक अशी स्पर्धा सुरू झाली ज्याचा शिरकाव प्रत्येक क्षेत्रात सुरू झाला, खासकरून संरक्षण व अवकाश संशोधनाच्या विभागात. ऑक्टोबर १९५७ मध्ये सोव्हियत संघाने पृथ्वीभोवती प्रदक्षिणा करण्यासाठी स्पुटनिक उपग्रह अंतराळात लाँच केला तेव्हा तो आपल्या या अभियानाबरोबरच अंतराळ स्पर्धेत अमेरिकेपेक्षा बराच पुढे निघून गेला. अर्थात शीतयुद्ध अजूनही सुरूच होते आणि कोणत्याही प्रकारे सोव्हियत संघाचं हे पुढे जाणं कमी करण्यासाठी अमेरिकेचे प्रयत्न सुरू होते.  अमेरिकेने आधीच...

@ २९ जुलै @* *जागतिक व्याघ्र दिन*

Image
 *@ २९ जुलै @* *जागतिक व्याघ्र दिन* जागतिक व्याघ्र दिन दरवर्षी २९ जुलै रोजी जगभर साजरा केला जातो. २९ जुलै २०१० रोजी रशिया मधील सेंट पीटर्सबर्ग येथे भरलेल्या व्याघ्र परिषदेत हा दिवस 'जागतिक व्याघ्र दिन' म्हणून घोषित करण्यात आला. या दिवसाचा उद्देश वाघांच्या नैसर्गिक अधिवासांच्या संवर्धनासाठी जागतिक पातळीवर प्रयत्न करणे, तसेच त्याबद्दल जनजागृती करणे आणि वाघांच्या संवर्धनासाठी येणाऱ्या समस्यांवर विचार करणे असा आहे. विसाव्या शतकाच्या सुरूवातीला जगभरात सुमारे एक लाख वाघ होते. सध्या सुमारे ३०६२ ते ३९४८ इतकी असल्याचा अंदाज आहे. यापैकी सुमारे २००० वाघ भारतीय उपखंडात आहेत. त्यामुळे या दिवसाचे महत्त्व भारतासाठी विशेष आहे. वाघांची संख्या झपाट्याने कमी होण्याची कारणे नैसर्गिक अधिवास नष्ट होणे, चोरटी शिकार इ. आहेत. सरकारी पातळीवरून जागतिक व्याघ्रदिनाच्या निमित्ताने कार्यक्रम घेतले जातात. तसेच व्याघ्र संवर्धनाच्या क्षेत्रात काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्था सुद्धा या निमित्ताने जनजागृतीसाठी कार्यक्रम करतात.

@ २८ जुलै @* *जागतिक कावीळ दिन*

Image
 *@ २८ जुलै @* *जागतिक कावीळ दिन* बरुच सॅम्युअल ब्लूमबर्ग (जन्म - २८ जुलै १९२५) हे अमेरिकन फिजिशियन नि अनुवंशशास्त्रज्ञ होते. १९७६ मध्ये त्यांना संक्रामक आजारांचा तंत्रासंबंधी शोध लावल्या बद्दल नोबेल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यांनी हेपेटायटीस बी विषाणूची ओळख पटविली आणि नंतर त्याचे निदान चाचणी व लस विकसित केली. कावीळ बाबत जनतेमध्ये जनजागृती व्हावी म्हणून त्यांचा जन्मदिन २८ जुलै हा 'जागतिक कावीळ दिन' म्हणून साजरा करण्यात येतो. आजच्या दिनानिमित्त कावीळ या रोगाबाबत डॉ. श्री बालाजी तांबे यांचा 'फॅमिली डॉक्टर' च्या २८ जुलै २०१७ अंकात प्रसिद्ध झालेला लेख. यकृताला झालेल्या जंतुसंसर्गामुळेही कावीळ होते, तेव्हा त्यास संसर्गजन्य लक्षण समजून काळजी घ्यावी लागते. कावीळ झाली असता हलके हलके डोळे पिवळे होतात, सर्व गोष्टी पिवळ्या दिसायला लागतात, त्वचा पिवळी दिसायला लागते व घामामुळे कपडेही पिवळे होऊ लागतात. कावीळ झालेल्या रुग्णापासून फार सांभाळून राहावे लागते. कारण त्याची लागण एकाकडून दुसऱ्याला लगेच होऊ शकते. कावीळ होण्यास प्रतिबंध होण्यासाठी हात न धुता काही खाऊ नये. वास्तविक ने...

@ २८ जुलै @* *जागतिक निसर्ग संवर्धन दिन*

 *@ २८ जुलै @* *जागतिक निसर्ग संवर्धन दिन* निसर्गातील अनेक घटकांचा वापर आपण आपल्या फायद्यासाठी करतो. परंतु, गरजेपलीकडे जाऊन असे घटक ओरबाडले जाऊ लागल्याने संपूर्ण सृष्टीचक्रातच अडथळे येऊ लागले आहेत. योग्य, शाश्वत आणि नियंत्रित वापराबद्दल सर्वत्र जनजागृती करण्यासाठी हा ‘नेचर कॉन्झर्वेशन डे’ जगभर पाळला जातो. विकास म्हणजे आपले उद्दिष्ट साधण्याच्या आड येणारे सर्व काही नष्ट करायचे अशी चुकीची संकल्पना. आधुनिक व सुखासीन जीवनशैली रुजू लागल्याने पृथ्वीवरील नैसर्गिक समतोल बिघडला. त्याचे परिणाम लवकरच दिसू लागल्याने निसर्ग संरक्षणाची आणि संवर्धनाची जाणीव सर्वांच्या मनात ठसविणे गरजेचे बनले. वस्तू आणि संसाधनांचा पुनर्वापर केल्यानेही खूप चांगला फरक पडतो असेही दिसून आले आहे. सध्या आपण वापरत असलेली नैसर्गिक साधनसंपत्ती तयार होण्यास हजारो वर्ष लागतात. परंतु आपण ती संपविण्याचाच निश्चय केल्या सारखी स्थिती आहे. यामुळे वने, वन्यजीव, वनांतून मिळणारे पदार्थ, खनिजे आणि खनिज इंधने सर्वच मौल्यवान स्रोतांवर असह्य ताण आला आहे व त्याचे परिणाम थोड्याच वर्षात वापरकर्त्याला म्हणजे आपल्यालाच भोगावे लागणार आहेत. जीवन...

📡🚀🛰️🇮🇳👮‍♂️🇮🇳🛰️🚀📡 *भारतरत्न* *अवुल पाकीर जैनुलाबदिन अब्दुल कलाम*

Image
                                                📡🚀🛰️🇮🇳👮‍♂️🇮🇳🛰️🚀📡               *भारतरत्न* *अवुल पाकीर जैनुलाबदिन अब्दुल कलाम*               तथा   *ए. पी. जे. अब्दुल कलाम* (भारताचे ११ वे राष्ट्रपती,  वैज्ञानिक, अभियंता) *जन्म : १५ ऑक्टोबर १९३*                 *(रामेश्वर)* *मृत्यू : २७ जुलै २०१५*                 *(शिलाँग)* सन्मान : भारतरत्न, पद्मभूषण, पद्मविभूषण                    कलाम यांनी आपले शालेय शिक्षण रामनाथपुरमला पूर्ण केले. लहान वयातच वडिलांचे छत्र गमावल्याने डॉ. कलाम गावात वर्तमानपत्रे विकून, तसेच अन्य  लहान मोठी कामे करून पैसे कमवीत व घरी मदत करीत होते. त्यांचे बालपण खूप कष्टात गेले. शाळेत असताना गणिताची त्यांना विशेष आवड लागली. नंत...

कारगिल विजय दिवस*

Image
             💣 *कारगिल विजय दिवस*         कारगिल युध्द हे भारत व पाकिस्तान यांच्या दरम्यान सन १९९९ च्या उन्हाळ्यात लढले गेलेले मर्यादित युद्ध होते. या युद्धाची व्याप्ती भारताच्या कारगिल व आजूबाजूच्या परिसरापुरतीच मर्यादित राहिली, त्यामुळे याला मर्यादित युद्ध म्हणतात. तसेच या पूर्वीच्या भारत पाक युद्धांप्रमाणेच याही युद्धात, युद्ध सुरू झाल्याची व संपल्याची कोणतीही घोषणा करण्यात आलेली नव्हती. उलट पाकिस्तानतर्फे युद्धादरम्यान त्यांचा देश अलिप्त आहे असा कांगावा करण्यात आला होता. पुढे अनेक वर्षांनंतर हळूहळू पाकिस्तान सरकारने व अनेक लष्करी अधिकाऱ्यांनी हे युद्धच होते असे जाहीर केले. इ.स. १९९९ च्या उन्हाळ्यात, पाकिस्तानी घुसखोरांनी भारतीय सीमा ओलांडून भारताच्या हद्दीतील अनेक ठाणी कब्जा केल्याचे भारताच्या लक्षात आले व या घुसखोरांना हुसकावण्यासाठी कारगिलचे युद्ध सुरू झाले. ही ठाणी कारगिल व द्रास परिसरातील अतिउंच दुर्गम जागी होती. अनेक महिन्यांच्या प्रयत्‍नांनंतर भारताला ही ठाणी परत मिळवण्यात यश मिळाले.         ...

@ २५ जुलै @* *देशाच्या पहिल्या महिला राष्ट्रपती*

 *@ २५ जुलै @* *देशाच्या पहिल्या महिला राष्ट्रपती* प्रतिभा देवीसिंह पाटील या भारतीय प्रजासत्ताकाच्या १२व्या राष्ट्रपती होत्या. त्यांनी राष्ट्रपती ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या कार्यकाळानंतर २५ जुलै २००७ रोजी राष्ट्रपतीपदाची जबाबदारी स्वीकारली. भारताच्या राष्ट्रपतीपदावर नेमल्या गेलेल्या त्या पहिल्या महिला होत्या. राष्ट्रपती होण्यापूर्वी त्या राजस्थानच्या १६ व्या राज्यपाल व प्रथम महिला राजस्थान राज्यपाल होत्या. तत्पूर्वी त्या राज्यसभेच्या उपसभापती व १९६२ ते १९८५ दरम्यान महाराष्ट्राच्या विधानसभेत आमदार व विविध खाताच्या मंत्री होत्या. राष्ट्रपती पदाच्या कार्यकाळात कुंटूंबियांसह जगभरात भ्रमंती करण्यासाठी त्या ओळखल्या जातात. राष्ट्रपतींना निवृत्ती नंतर मिळणाऱ्या घरासाठी ज्याची कमाल मर्यादा २००० वर्ग फुट असते त्यात पाटील यांनी सैनिकांसाठी आरक्षित पुणे येथील २ लक्ष वर्ग फुट जागा घेतली, यावर टिका झाल्या नंतर मात्र त्या ६००० वर्ग फुटावर बंगला बांधला आहे.

२५ जुलै ❀* *वन्यजीवतज्ञ जिम कॉर्बेट जन्मदिन*

 *❀ २५ जुलै ❀* *वन्यजीवतज्ञ जिम कॉर्बेट जन्मदिन* जन्म - २५ जुलै १८७५ (नैनिताल,उत्तराखंड) स्मृती - १९ एप्रिल १९५५ (केनिया) एडवर्ड जेम्स जिम कॉर्बेट हे नरभक्षक वाघ व त्यांच्या शिकारींच्या हकीकती लिहिणारे आयरिश वंशाचे हिंदुस्थानात जन्मलेले एक विश्वविख्यात शिकारी व लेखक होते. एकूण १९ वाघ आणि १४ बिबट्यांची शिकार त्यांनी केली. त्यांचा जन्म हिमालयाच्या कुमाऊॅं पर्वत रांगांच्या खोऱ्यात वसलेल्या नैनिताल (उत्तराखंड) येथे झाला. ते क्रिस्टोफर आणि मेरी जेन कॉर्बेट यांचे आठवे अपत्य होते. जिमच्या जन्माआधी त्यांचे वडील क्रिस्टोफर यांना नैनिताल येथे पोस्टमास्तर म्हणून नोकरी मिळाली. त्यांचे एक घर कालाधुंगी येथेही होते. उन्हाळी सुट्यांसाठी सर्व कुटुंबिय तेथेच वास्तव्यास असत. लहानपणापासून जिम यांना वन्यजीवांविषयी आकर्षण होते. दिवसचे दिवस ते झाडाला लटकून जंगलात घडणाऱ्या गोष्टी आपल्या डोळ्यांनी टिपत. या सवयीचा त्यांना पुढील आयुष्यात खूप फायदा झाला. वडिलांच्या अकाली निधनानंतर जिमचे मोठे भाऊ टॉम यांना नैनिताल येथील पोस्टातच नोकरी मिळाल्याने समस्त कुटुंबिय तेथेच राहिले. जिम यांचे शालेय शिक्षण नैनितालच्या ओ...

@ २४ जुलै @* *भारतीय विज्ञान संस्था स्थापना दिन*

Image
 *@ २४ जुलै @* *भारतीय विज्ञान संस्था स्थापना दिन* स्थापना - २४ जुलै १९११ भारतीय विज्ञान संस्था (Indian Institute of Science) ही संशोधन आणि उच्च शिक्षणासाठी असलेली अग्रेसर शिक्षण संस्था बंगळूर, भारत येथे आहे. या संस्थेत पदव्युत्तर तसेच डॉक्टरेट कार्यक्रम आहेत. ज्यामध्ये २०० पेक्षा अधिक संशोधक ३७ पेक्षा अधिक विभागांमध्ये काम करतात. उदाहरणार्थ- अभियांत्रिकी मध्ये अंतरीक्ष अभियांत्रिकी, संगणकशास्त्र आणि स्वयंचलन इत्यादी, आणि शास्त्रांमध्ये भौतिकशास्त्र, रसायन शास्त्र इत्यादी. भारतीय विज्ञान संस्था भारतातील संशोधनसंस्थांमध्ये पहिल्या दर्जाची संस्था आहे. भारतीय विज्ञान संस्था सन १९०९ मध्ये उद्योगपती जमशेदजी टाटा यांच्या दूरदृष्टीतुन जन्माला आली. सन १८९८ मध्ये एक तात्पुरती समिती स्थापन करण्यात आली. नोबेल पारितोषिक विजेते सर विलियम रॅम्से यांनी बंगळूर हे आदर्श ठिकाण सुचवले आणि मॉरिस ट्रॅव्हर्स संस्थेचे पहिले संचालक बनले.

*@ २४ जुलै @* *भारतीय आयकर दिवस*

Image
 *@ २४ जुलै @* *भारतीय आयकर दिवस* आज भारतीय आयकर (इन्कम टॅक्स) दिवस. २४ जुलै १८६० रोजी जेम्स विल्सन या भारताच्या पहिल्या ब्रिटीश अर्थ अधिकाऱ्याने भारतीयांवर इन्कम टॅक्स आकारण्यास सुरवात केली म्हणून आजच्या दिवशी आयकर दिवस साजरा करण्यात येतो. इन्कम टॅक्सचा हा कायदा १८६५ साली बंद पाडण्यात आला आणि १८८६ मध्ये इन्कम टॅक्सचे नवे रूप भारतातील नागरिका समोर सादर करण्यात आले. पुढे काही बदल करून भारतीय आयकर कायदा १९२२ साली इंग्रजांनी अंमलात आणला, जो भारत स्वतंत्र झाल्या नंतरही १९६१ साला पर्यंत वापरात होता. १९६१ च्या एप्रिल महिन्यात इंग्रजांचा हा आयकर कायदा रद्द करून भारताचा नवा आयकर कायदा अस्तित्वात आणण्यासाठी लोकसभे मध्ये इन्कम टॅक्सचे विधेयक सादर करण्यात आले. १३ सप्टेंबर १९६१ रोजी या विधेयकाला राष्ट्रपतींनी मंजुरी दिली आणि अश्या प्रकारे भारतीय संविधानाच्या आधारावर निर्माण झालेला इन्कम टॅक्स कायदा भारतात रूढ झाला.

*क्रांतिकारक चंद्रशेखर* *आझाद*

                                                                                                                          🔫 *क्रांतिकारक चंद्रशेखर*                 *आझाद* 🔫       *जन्म : २३ जुलै, १९०६* (भाबरा, झाबुआ, अलिराजपूर, मध्यप्रदेश)      *विरमरण : २७फेब्रुवारी,*                        *१९३१*       (अल्फ्रेड पार्क, अलाहाबाद) चळवळ: भारतीय स्वातंत्र्यलढा संघटना: कीर्ति किसान पार्टी,               नवजवान किसान सभा धर्म: हिंदू वडील: पंडित सिताराम तिवारी आई: जगरानी देवी         ...

*लोकमान्य* *बाळ गंगाधर टिळक*

                   *लोकमान्य*      *बाळ गंगाधर टिळक* *जन्म: २३ जुलै १८५६* (चिखली, दापोली,रत्‍नागिरी, महाराष्ट्र, ब्रिटिश भारत) *मृत्यू: १ ऑगस्ट १९२०* (पुणे, महाराष्ट्र, ब्रिटिश भारत) चळवळ: भारतीय स्वातंत्र्यलढा संघटना: अखिल भारतीय काँग्रेस पत्रकारिता/ लेखन: केसरी, मराठा पुरस्कार: लोकमान्य, भारतीय असंतोषाचे जनक प्रमुख स्मारके: मुंबई, दिल्ली इ. धर्म: हिंदू प्रभाव: शिवाजी महाराज, तात्या टोपे, महाराणा प्रताप प्रभावित: महात्मा गांधी, चाफेकर बंधु, स्वातंत्र्यवीर सावरकर, देवेंद्र फडणविस, बाळासाहेब ठाकरे वडील: गंगाधर रामचंद्र टिळक आई: पार्वतीबाई टिळक पत्नी: सत्यभामाबाई अपत्ये: श्रीधर बळवंत टिळक  घोषणा : "स्वराज्य हा माझा जन्म सिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळविणारच. "       हे भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील स्वातंत्र्यसेनानी, राजकारणी, तत्त्वज्ञ, संपादक, लेखक आणि वक्ते होते. 'लोकमान्य' या उपाधीने त्यांचा उल्लेख केला जातो. 👦 *बालपण* टिळकांचा जन्म २३ जुलै इ.स. १८५६ मध्ये रत्‍नागिरीमधील मधल्या आळीत, एका मध्यमवर्गीय ब्राह्...

@ २२ जुलै @* *भारतीय राष्ट्रध्वज 'तिरंगा' स्वीकृती दिन*

Image
 *@ २२ जुलै @* *भारतीय राष्ट्रध्वज 'तिरंगा' स्वीकृती दिन* भारतीय राष्ट्रध्वज (तिरंगा) २२ जुलै १९४७ रोजी, भारत देशाला स्वातंत्र्य मिळण्याच्या २४ दिवस आधी अंगीकारला गेला. २४ मार्च रोजी इंंग्रजांनी लवकरच भारत सोडून जाण्याचा आपला निर्णय जाहीर केला. स्वतंंत्र भारताचा ध्वज कसा असावा हे ठरविण्यासाठी तातडीने एक समिती नेमली गेली. त्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे प्रमुख होते. त्यांनी ठरवले की कॉंग्रेसचा ध्वज हाच स्वतंंत्र भारताचा ध्वज म्हणून घोषित करावा, फक्त चरख्याऐवजी अशोकचक्र हे चिह्न ध्वजाच्या मध्यभागी विराजमान व्हावे. घटना समितीने २२ जुलैला या ठरावाला मंंजुरी दिली. भारताच्या राष्ट्रीय ध्वजात चार रंगाचा वापर केला गेला आहे. केशरी, पांढरा, हिरवा आणि निळा. त्यामुळे भारताचा राष्ट्रीय ध्वज, रंगाचाच विचार केला तर तिरंगा नसून चौरंगा आहे. २२ जुलै १९४७ रोजी घटना समितीच्या बैठकीत 'तिरंगी ध्वज' भारताचा अधिकृत राष्ट्रीय ध्वज म्हणून स्वीकृत करण्यात आला. त्या संबंधीचा ठराव पंडित जवाहरलाल नेहरू यांनी मांडला. एकाला एक लागून असलेल्या आडव्या समान प्रमाणाच्या तीन पट्ट्यांचा तो आहे. वरती गर्द केशर...

❀ २२ जुलै ❀* *गणितयोगी डॉ. श्रीराम अभ्यंकर जन्मदिन*

 *❀ २२ जुलै ❀* *गणितयोगी डॉ. श्रीराम अभ्यंकर जन्मदिन* जन्म - २२ जुलै १९३० (उज्जैन,मध्यप्रदेश) स्मृती - २ नोव्हेंबर २०१२ (इंडियाना,अमेरिका) डॉ. श्रीराम अभ्यंकर यांना गणिताचे बाळकडू त्यांचे वडील शंकर अभ्यंकर यांच्याकडून मिळालेले होते. त्यांचे वडील हे मध्य प्रदेशातील उज्जन व ग्वाल्हेर येथे गणिताचे प्राध्यापक होते. डॉ. श्रीराम अभ्यंकर यांचा पुण्याशी अतूट संबंध होता. अनेकदा ते येथे त्यांच्या बंगल्यात वास्तव्यास असत व येथे आले की, मुलांना गोळा करून गणित शिकवण्याचा मोह त्यांना कधीच आवरत नसे. इतके त्यांचे गणितावर व अध्यापनावर प्रेम होते. पुण्यातील भास्कराचार्य प्रतिष्ठान या गणित अभ्यासाच्या संस्थेची स्थापना डॉ.श्रीराम अभ्यंकर यांनी केली होती. पुणे हे भारतातील गणित शिक्षणाचे केंद्र व्हावे अशी त्यांची मनोमन इच्छा होती. मुलांना गणित हे मराठी भाषेतून शिकता आले पाहिजे असे त्यांना वाटत होते. गणिताच्या अभ्यासक्रमासाठी प्रत्येक वर्गाकरिता वेगवेगळी पुस्तके असतात त्याऐवजी एकच पुस्तक असावे म्हणजे ज्याला जसे शक्य होईल तसे तो कुठल्याही इयत्तेच्या पातळीवरील गणिताचा अभ्यास हवा तेव्हा करू शकेल असे त्यांना...

@ २२ जुलै @* *अप्रॉक्झिमेट डे*

 *@ २२ जुलै @* *अप्रॉक्झिमेट डे* आज 'पाय्' (π) अप्रॉक्झिमेट डे साजरा केला जातो. कारण हा दिवस २२/७ अपूर्णाक सुचवतो. दहावी पर्यंतच्या गणिताची ओळख असणाऱ्या सर्वानाच ‘पाय्’ म्हणजे π ही संज्ञा नवीन नाही. वर्तुळाचा व्यास वा त्रिज्येवरून वर्तुळाचे परिघ व क्षेत्र काढण्यासाठी या संज्ञेचा वापर केला जातो. आज २२ जुलै. म्हणजेच वेगळ्या स्वरूपात ही तारीख लिहायची झाली तर २२/७ अशी लिहितात. या संख्येला गणिती भाषेत ‘पाय्’ असे म्हणतात. ‘पाय्’ (π) च्या मूल्याच्या आधारावरून अनेक सिद्धांत व प्रमेयं गणित विश्वात प्रचलित आहेत. परंतु π चे खरं मूल्य अजूनही कोणाला ओळखता आलेलं नाही. ‘पाय्’ (π) अप्रॉक्झिमेट डे साजरा केला जातो. कारण हा दिवस २२/७ अपूर्णाक सुचवतो. π ही संख्या ३.१४ अशीही दशांश स्वरूपात मांडली जाते. असं म्हणतात की, याचा आणखी एक योगायोग असा आहे की, याच दिवशी आर्किमिडिजचा जन्मदिवस आहे, ज्याने π ची अचूक किंमत शोधली.  ग्रीक मूळाक्षरातील ‘प्’ साठी वापरात असलेली ही संज्ञा आता जवळ जवळ अंक म्हणूनच ओळखली जात आहे. या अंकाचे मूळ शोधणे तितकेसे कठिण नाही. पुरातन काळच्या इजिप्त, भारत, बॅबिलोनिया व ग्रीक येथी...

विठ्ठल सखाराम पागे* (स्वातंत्र्य सैनिक व रोजगार हमी योजनेचे जनक)

                *विठ्ठल सखाराम पागे*                                                                  (स्वातंत्र्य सैनिक व रोजगार हमी योजनेचे जनक)                                         *जन्म : 21 जुलै 1910*     (वाळवा, सांगली, महाराष्ट्र)       *मृत्यू : 16 मार्च 1990*  शिक्षण : B.A.LLB                                                   ग्रामीण भागातील ‘रोजगार निर्मिती’ या क्षेत्रात देशातील इतर राज्यांना आदर्शकृत ठरलेल्या महाराष्ट्राच्या रोजगार हमी योजनेचे जनक आणि महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापतिपद अठरा वर्षे सांभाळणारे...

❀ २१ जुलै ❀* *साहित्यिक अर्नेस्ट हेमिंग्वे जन्मदिन*

 *❀ २१ जुलै ❀* *साहित्यिक अर्नेस्ट हेमिंग्वे जन्मदिन* जन्म - २१ जुलै १८९९ (अमेरिका) स्मृती - २ जुलै १९६१ (अमेरिका) साहित्यिक अर्नेस्ट हेमिंग्वे यांचा जन्म अमेरिकेत झाला. आपल्या हयातीतच मान, सन्मान, पैसा, प्रतिष्ठा, प्रसिद्धी मिळण्याचे भाग्य अर्नेस्ट हेमिंग्वे या लेखकाला लाभले. आपले शिक्षण संपल्यावर त्यांनी ‘कॅन्सार सिटी स्टार’ या वृत्तपत्रात बातमीदाराची नोकरी पत्करली. याच सुमारास युद्ध सुरू झाले. युद्धाचं त्यांना विलक्षण आकर्षण असल्याने सैनिक म्हणून प्रवेश नाकारल्यावर एका रुग्णवाहिकेचे चालक म्हणून ते इटालियन आघाडीवर गेले. युद्धातील तेथील अनुभव कादंबरी लेखनाला उपयोगी पडले. त्यावर आधारित ‘द सन ऑल्सो राइझेस’ ही कादंबरी लिहिली. युद्धोत्तर काळातील हरवलेली पिढी या विषयावरील ही कादंबरी खूप गाजली. ‘फिएस्टा’ ही कादंबरी बैलाशी झुंज लावणाऱ्या एका युवकाची आहे. ‘अ फेअरवेल टू आम्र्स’ या त्यांच्या कादंबरीवर चित्रपटही निघाला.  दुसऱ्या महायुद्धाच्या काळात स्पेन मध्ये यादवी युद्ध सुरू होते. या यादवीत एका अमेरिकन क्रांतिकारकाला हौतात्म्य आले. त्यावर ‘फॉर हूम द बेल टोल्स’ ही कादंबरी लिहिली. लेखना...

✹ २१ जुलै ✹* *लेखक राजा राजवाडे स्मृतिदिन*

 *✹ २१ जुलै ✹* *लेखक राजा राजवाडे स्मृतिदिन* जन्म - १ जानेवारी १९३६ (देवरूख,रत्नागिरी) स्मृती - २१ जुलै १९९७ लेखक राजा राजवाडे यांचा जन्म देवरूख जवळच्या निवे बुद्रुक जि.रत्नागिरी येथे झाला. त्यांच्या वडीलाचं देवरूखला हॉटेल होतं. व पूर्वापार चालत आलेली निवे गावात शेती होती. हा एक कौटुंबिक पार्श्वभूमीचा भाग आहे. बाबांचं मॅट्रिक पर्यंतचं शिक्षण, देवरूखच्या ‘न्यू इंग्लिश स्कूल मधून झाल्यानंतर, राजा राजवाडे पुढील शिक्षणासाठी मुंबईला आले. राजा राजवाडे यांचे शिक्षण मुंबईतील खालसा कॉलेज मधून अर्थशास्त्र व राज्यशास्त्र हे विषय घेऊन बी.ए झाले. त्यावेळी नोकऱ्यांचा सुकाळ होता. राजा राजवाडे  यांनी एम्प्लॉयमेंट एक्स्चेंज मध्ये नाव नोंदवलं. तिथून त्यांना मुंबई महानगरपालिकेत नोकरी मिळाली. तोपर्यंत ते गिरगावात राहायला आले होते. १९६५ च्या सुमारास राजा राजवाडे  यांनी लेखन सुरू केले. १९६२ साली ‘स्त्री’ मासिकात ‘उन्हातलं घर’ ही कथा पहिल्यांदा आली. ते गिरगावात राहात असल्याने, मुंबईतलं साहित्यिक क्षेत्र जवळपासचं. तिथून साहित्य संघ, मौजचं ऑफिस, मॅजेस्टिकचं ऑफिस सर्व जवळपास. त्यामुळे अनेक नावाजले...

❀ २० जुलै ❀* *जीवशास्त्रज्ञ डॉ. पुरुषोत्तम देवरस जन्मदिन*

 *❀ २० जुलै ❀* *जीवशास्त्रज्ञ डॉ. पुरुषोत्तम देवरस जन्मदिन* जन्म - २० जुलै १९०९ (बिलासपूर,मध्यप्रदेश) स्मृति - ३० ऑगस्ट १९९१  जागतिक कीर्तीचे सर्पतज्ज्ञ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या डॉ. पुरुषोत्तम जयकृष्ण देवरस यांचा जन्म मध्यप्रदेशातील बिलासपूर शहरात झाला. मध्यप्रदेशातच शालेय शिक्षण झाल्यानंतर त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण नागपूरला झाले आणि तेथील विज्ञान महाविद्यालयामधून त्यांनी प्राणिशास्त्रात एमएस्सी ची पदवी प्राप्त केली. त्यानंतर दोन वर्षे खेड्यापाड्यांत राहून भातावरील ‘गाद’ नावाच्या कीटकामुळे उद्भवणाऱ्या रोगांवर त्यांनी मौलिक संशोधन केले. पुढे १९३८ साली ते हिंदू एज्युकेशन फंडाची शिष्यवृत्ती मिळवून  इंग्लंडला गेले. तेथे प्रथम एडिन्बरा व नंतर डरहॅम विद्यापीठाच्या किंग्ज महाविद्यालया मध्ये त्यांनी ‘आफ्रिकेतील काही उंदरांवरील कीटक’ आणि ‘प्लासी नदीच्या खोर्‍यात अ‍ॅलर्जी उत्पन्न करणारे केडीस फ्लाइज’ या दोन विषयांवर संशोधन करून पीएच.डी. पदवी संपादन केली. भारतात परतल्यावर अखिल भारतीय कृषी संशोधन संस्था, दिल्ली येथे माशी व डास यांच्यावर त्यांनी संशोधन केले. पुढे १९४२ साली त्यांनी ट...